Thursday, January 19, 2012

संवेदना



आनंद झाला म्हणून असो किंवा वेदना, दुखः झालं म्हणून असो ... माणूस वेग-वेगळे आवाज काढून ते व्यक्त करतो ..  भावना व्यक्त करण्या साठी एक अत्यंत प्रभावी साधन आपल्याला मिळालेले आहे... शोकात बुडालेल्या एखाद्या व्यक्तीला म्हणूनच  मनसोक्त रडण्या करता प्रवृत्त करण्यात येते ... आज काल हास्य क्लब सुद्धा तसेच काही करतात .. भावनांना प्रभावी पणे वाट करून देण्या साठी "आवाज करणे " हा मार्ग आपण नकळत अवलंबतो. आपण ढोल वाजवून, संगीत वाद्य वाजवून आनंदाच्या भावना व्यक्त करतो.
लहान बाळ, कुत्र्या - मांजरी चे छोटे पिल्लू हि आपल्या भावना व्यक्त करण्या साठी वेग-वेगळे आवाज करते.

शब्दात व्यक्त न होऊ शकणार्या अनेक प्रकारच्या भावना शोधण्या साठी , विविध रस ( विरह , व्याकुळता , कारुण्य  इ ) जाणून घेण्या साठी , हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताची सुरवात झाली असावी, बहुतेक असेच संगीत हि उत्पन्न झाले असावे.... 

हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतात सर्व रस आहेत ( विभत्स व विनोद रस सोडून ). अनेक शास्त्रीय संगीतकार आपल्या गायना च्या माध्यमातून अध्यात्मिक उन्नती करून घेतात. हे  तंत्र बहुतेक स्वतः चा , स्वतः च्या भावनांचा शोध करून घेत ..पुढे त्या माध्यमातून अनंत ( unknown ) शोधण्यात उपयोगी असावे.
मला हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत स्वतः च्या भावना शोधण्या साठी खूप उपयोगी वाटते  ( going from known to unknown), शब्दात न मांडता येणारे अनेक भाव केवळ स्वरांच्या माध्यमातून आपल्याला स्वतः ची ओळख करून देतात. 
उदाहरण देयचे झाले तर  दरबारी कानडा हा राग रोद्र रस , आर्जव व कारुण्य रस एकत्र उत्पन्न करणारा आहे आणि त्यातील अति कोमल गांधार हा स्वर हि गंभीरता उत्पन्न करतो .. हा अति कोमल गांधार स्वर गजेंद्र मोक्ष कथेतील , हत्तीच्या विव्हळण्यातून उत्पन्न झाला असे म्हणतात.

पुरिया धनाश्री चे असेच .. फक्त आलापी  सुद्धा प्रभावी पणे संध्याकाळची आर्तता, कारुण्य आणि विचित्र हवी हवीशी ओढ .. पटकन दाखवून जाते ... कोमल रिषभ आणि धैवाताची हि जादू आहे 

असेच तोडी रागाचे आहे ..सर्व  कोमल स्वर घेणार्या रागाचा अति कोमल रिषभ हा स्वर शांत वातावरण निर्माण करतो , मनाला शीतलता देतो ... 
मियां तानसेन दीपक राग  गाऊन झाल्यावर प्रचंड अस्वस्थ झाला , मनाचा तोल ( nervous  breakdown ) गेल्या मुळे.. फिरत फिरत दक्षिणे कडे आला.. तिथे गुजरी प्रांतात त्याला दोन गुजरी मुली पाणी भरत काही  गाताना ऐकू आल्या.. त्यांचे गायन  ऐकून  तानसेन चे मन शांत झाले .. परत तो स्वस्थ झाला , गाऊ लागला आणि उत्तरे कडे गेला ! हीच ती  गुजरी तोडी !
अशा अनेक आख्याईका आहेत ..  

एक मात्र खरं... तानसेन असो  वा कानसेन संगीताची संवेदना  सारखीच !



No comments: